वृक्ष मंदिर
प्रास्ताविक
वृक्ष
मंदिर या लघु कादंबरीचा विषय गेले जवळपास १५ ते २० वर्षे माझ्या डोक्यात घोळत
होता. ज्यावेळी महाराष्ट्र सरकारने सामाजिक वनिकरण हे खाते निर्माण केले
तेव्हापासुन ही कथा माझ्या मनात आकार घेत होती. गेली अनेक वर्षे मी समर्थ
साहित्याचा अभ्यास करीत आहे. त्याचप्रमाणे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले प्रेणित
स्वाध्याय परिवाराच्या स्वाध्यायालाही जात असे. स्वाध्याय परिवारा तर्फे योगेश्वर
शेती त्याचप्रमाणे मत्स्यगंधा हे प्रयोग राबवले जातात. त्यातला मत्स्यगंधेचा
प्रयोग मी प्रत्यक्ष पाहिला आहे. आपल्या पारंपारीक एकादशीव्रताचा समाजाला कसा
फायदा करुन देता येईल या दृष्टीने उपयोगी पडेल
असे उपक्रम स्वाध्याय परिवारा तर्फे राबवले जातात.
समर्थ
रामदासस्वामी हे तर निसर्गप्रेमीच होते. ते रानावनात रमणारे योगी होते. त्याचे
बागप्रकरण तर प्रसिद्धच आहे. तुकाराम महाराजांचे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा
अभंगही प्रसिद्धच आहे. या सर्वामधुन प्रेरणा घेऊन वृक्ष मंदिर ही लघुकादंबरी
साकारली आहे. कितपत जमली आहे ते वाचकच ठरवतिल. पर्यावरण रक्षण, बेकारी आणि
व्यसनाधिनता यावर उपाय म्हणून वृक्ष मंदिरासारखे उपक्रम निर्माण झाले, तर माझ्या
या लेखनाचे सार्थक झाले असे मला वाटेल.
श्रीवर्धन
दिनांक:-१८/०४/२०१८ अनिल अनंत वाकणकर.
अक्षय तृतिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा