शुक्रवार, १९ जुलै, २०१९

हकिमबाबा

।।श्रीराम।।

मला भावलेले व्यक्तिमत्व:हकिमबाबा

          परवा सहज सायकलवर चक्कर मारायला बाहेर पडलो होतो. तेव्हा बुडन पाखाडी, सराई मोहल्ला, चौकर पाखाडी असा फिरत फिरत समुद्रावर गेलो होतो. त्यावेळी सराई मोहल्यातुन जाताना हकिमबाबांचा दवाखाना आणि दुकानाची जागा नजरेस पडली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारची माणसे भेटतात. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते. काहीजण आपल्या ह्रदयांत कायमची घर करुन बसतात. हकिमबाबा हे एक त्यातलेच व्यक्तिमत्व आहे. त्यांना विसरावे म्हटले तरी विसरता येणार नाही.
मी पोस्टमन म्हणून काम करताना त्यांना अनेक वेळा भेटलो. सुरवातिल पत्र टाकण्यापुरता संबंध होता. नंतर नंतर ओळख वाढत गेली. सराई मोहल्याच्या नाक्यावर त्यांचे दुकान आणि दवाखाना होता. त्याकाळात पोस्टाने पत्रव्यवहार जास्त होत असत. त्यामुळे त्यांच्या दुकानात पोस्टकार्ड, अंतर्देशिय पत्र, पाकिटे, मनी ऑर्डर फॉर्म विक्रिला ठेवलेले असत. मी जेव्हा पत्र वाटायला त्यांच्याकडे जात असे तेव्हा ते पोस्टातुन पोस्टाची स्टेशनरी(कार्ड, पाकिटे वगैरे) आणायला सांगत असत. कधी कधी अचानक आमची बीट बदलली जायची मग त्यांनी दिलेल्या पैश्यांची स्टेशनरी घेतली तरी लगेचच पोचवली जायची नाही. तरीही त्यांनी कधीही  अविश्वास दाखवला नाही. या व्यवहारातुन त्यांची ओळख वाढत गेली. सुरवातिला ते डॉक्टर आहेत हेच मला माहित नव्हते.
हकिमबाबा ही अतिशय धार्मिक व्यक्ती होती. तिन वेळचा त्यांचा नमाज कधी चुकला नाही. ते नियमितपणाने जशी अजमेर शरिफ येथे मनी ऑर्डर करायचे तशीच तुळजापुरला अथवा गाणगापुरला देखिल करायचे ते म्हणायचे मी कबीर पंथी आहे. त्यांनी नाशिक येथिल आयुर्वेद सेवा संघामध्ये आयुर्वेदाचे शिक्षण घेतले तर युनानी हकीमीचे शिक्षण उत्तर प्रदेशांत घेतले होते. एकुण जवळपास बारा वर्षे त्यांनी आयुर्वेद आणि युनानीचे शिक्षण घेतले होते.
त्यांच्याकडे शारंगधर संहितेची मूळ संस्कृत पोथी होती. त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे काढे, भस्मे, रसायने, प्राश बनवायचे फॉर्म्युले होते. पूर्वी हकिमबाबा अनेक प्रकारची औषधे स्वत: बनवत असत. परंतु बाजारात तयार आयुर्वेदिक औषधे मिळायला लागल्यापासून त्यांनी औषधे बनवणे सोडले होते. नाशिकच्या दाते वैद्यांच्या आठवणी ते नेहमी सांगत असत. माझे एक चुलत चुलत आजोबा कै. धोंडो वाकणकर हे देखिल वैद्य होते. त्यांच्या आठवणी देखिल ते सांगत असत.
त्यांच्याकडे अनेक प्रकारचे काढे, आसवे, च्यवनप्राश सारखे प्राश, निरनिराळ्या मात्रा उपलब्ध असत. त्यांच्याकडे दुपारी खेडेगावातल्या रुग्णांची गर्दी होत असे. त्या रुग्णांवर ते अतिशय अल्पदरात उपचार करित असत. जुन्या दिर्घकाल असणाऱ्या रोगांवर ते खात्रीने उपचार करीत असत. मी देखिल अनेक वेळा किरकोळ किरकोळ रोगांवर त्यांच्याकडून उपचार घेत असे. आपल्या घरांत सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तुंचा औषधी उपयोग ते सांगत असत. मला नेहमी तोड येण्याचा म्हणजेच छाले पडण्याचा त्रास होता. त्यावर त्यांनी त्याकाळी प्रत्येक घरी सहज उपलब्ध असणारे मायफळ उगाळुन लावायला सांगितले होते. त्याने मला ताबडतोब आराम पडत असे. त्यांनी सांगितलेला हा उपचार मी एका एम्. बी. बी. एस्. झालेल्या डॉक्टरांना देखिल सांगितला होता. विशेष म्हणजे त्या डॉक्टरांना त्या उपचाराचा लगेचच प्रत्यय देखिल आला होता.
हकिमबाबा जसे शरिरावरच्या रोगावर उपचार करित असत तसेच ते मानसिक रोगावर देखिल त्यांच्या पध्दतीने उपचार करीत असत. लोकांना हकिमबाबांना जादू टोणा करतात असे वाटायचे परंतु तो त्यांचा मानमिक उपचार असे. याबाबत मी त्यांच्याशी एकदा बोललो होतो. त्यावर त्यांनी सांगितले होते, ज्या रोग्याच्या मनात माझ्यावर करणी केली आहे, मला कुठलीतरी भूतबाधा झाली आहे असे ठाम बसले आहे. तो रोगी शरिरावर केलेल्या कोणत्याही  उपचाराने बरा होणार नाही. त्याला उपचार देखिल मानसिकच हवा. म्हणून ते त्या मानसिक रोगी असलेल्या रोग्याला उतारा वगैरे काढायला सांगत असत. त्यांच्या या उपचाराने आणि जोडीला आयुर्वेदिक औषधाने तो रोगी खडखडीत बरा होत असे.
या बाबतित मला माझ्या आतेभावाची गोष्ट आठवते तो प्राथमिक शिक्षक होता. या शिवाय खेडेगावांत पौराहित्यही करीत असे. त्याच्यावर अनेकांचा विश्वास होता. गुरुजींनी काही तोडगा सांगितला तर नक्की परिणाम होईल असा त्याच्या विषयी लोकांचा समज होता. एकदा मी त्याच्याकडे गेलो होतो. तेव्हा दोघीजणी सासवा सूना आल्या होत्या. त्या सासुचा  प्रश्न होता मुलाचे लग्न होऊन दोन वर्षे झाली तरी मुलबाळ काही नाही काहितरी तोडगा सांगा. त्यावर माझ्या भावाने त्यांना एका विड्याच्या पानावर हळदकुंकू, वगैरे साहित्य ठेवुन ठरावीक दिवशी तिन्हीसांजा ते पान मुलाने आणि सुनेने चव्हाट्यावर ठेवावे असे सांगितले.
त्या दोघीजणी निघुन गेल्यावर मी त्याला हे काय असे विचारले त्यावर त्याने सांगितले, अरे अनिल! या बाईचा मुलगा मुंबईत, आणि सून इथे गांवाला तेव्हा त्यांचे पोटपाणी पिकेलच कसे. परंतु मी जर असे सरळ सांगितले तर त्या बाईला पटणार नाही. परंतु आता मी सांगितलेला तोडगा पुरा करायला ती मुलाला गावाला बोलवेल त्यानंतर सुनेला आणि मुलाला  तो तोडगा पुरा करायसाठी एकत्र यावे लागेल हा असा माझा उपचार आहे. हकिमबाबा तरी काय वेगळे वागत होते. जसा रुग्ण तसा उपचार हे त्यांचे धोरण होते.
असे हे हकिमबाबा माझ्या कायम स्मरणात राहिलेले आहेत. माझ्या मनाचा एक कोपरा त्यांनी व्यापला आहे. पोस्टमन मधुन प्रमोशन झाल्यानंतर माझे श्रीवर्धन सुटले, त्यांचा संपर्कही तुटला. कधीतरी ते पैगंबरवासी झाल्याचे समजले. त्यांच्या दुकानावरुन जाताना हे सर्व आठवले. त्यांचे आता दुकान चालू दिसले परंतु दवाखाना मात्र बंद दिसला. त्यांच्या कडील शारंगधर संहितेतिल अनेक फॉर्म्युले मी लिहून घेतले होते. त्या वह्या कोणालातरी वाचायला दिल्या त्या त्याने परत केल्याच नाहित. त्यामुळे ती देखिल त्यांची आठवण आता शिल्लक नाही. त्यातल्या फॉर्म्युल्यावरुन मी आडुळशाचा काढा केला होता तो जवळपास दोन वर्षे आम्ही वापरत होतो.
अशा या हकिमबाबांना माझी ही आदरांजली.  

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

भूपाळ्या भाग १


उत्थापन
प्रभात काळी उठुनी सकाळी वनमाळी गावा
सद्भावे पदकमली सतत आश्रय मागावा ।।धृ।।
रामकृष्ण हरि विठ्ठल केशव घेऊनिया नामा
ब्रह्मानंदी मग्न होऊनी प्रत्यय जाणावा ।।१।।
नश्वर हा संसार असा निज आत्मा बोधावा
परमार्थी मन वळवुनी शाश्वत मोक्षचि साधावा।।२।।
सगुणी निर्गुण जाणुनी आत्मा स्वरुपी मिळवावा
प्रेमळ छंदे गाऊनिया प्रभु हळु हळु आळवावा।।३।।

*******
गरुडाचे पायी ठेवीन वेळोवेळी डोई
वेगे आणावा तो हरी मग दिनाते उध्दरी।।
पाय लक्ष्मीचे हाती तिचे आम्ही काकुळती
तुका म्हणे शेषा  जागे करा ह्रषीकेषा।।
उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज
उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं कुरु।।
    
भूपाळी गणपतीची
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी ॥ धृ ॥
अंगी शेंदुराची उटी । माथां शोभतसे किरीटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी शोभा। स्मरतां उभा जवळी तो ॥२॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकाची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी ॥ धृ ॥

भूपाळी रामाची
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णियली। गणिका केली ते मुक्त॥२॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिलें भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैल्यबाळीसमवेत ॥ धृ ॥

भूपाळ्या भाग १


उत्थापन
प्रभात काळी उठुनी सकाळी वनमाळी गावा
सद्भावे पदकमली सतत आश्रय मागावा ।।धृ।।
रामकृष्ण हरि विठ्ठल केशव घेऊनिया नामा
ब्रह्मानंदी मग्न होऊनी प्रत्यय जाणावा ।।१।।
नश्वर हा संसार असा निज आत्मा बोधावा
परमार्थी मन वळवुनी शाश्वत मोक्षचि साधावा।।२।।
सगुणी निर्गुण जाणुनी आत्मा स्वरुपी मिळवावा
प्रेमळ छंदे गाऊनिया प्रभु हळु हळु आळवावा।।३।।

*******
गरुडाचे पायी ठेवीन वेळोवेळी डोई
वेगे आणावा तो हरी मग दिनाते उध्दरी।।
पाय लक्ष्मीचे हाती तिचे आम्ही काकुळती
तुका म्हणे शेषा  जागे करा ह्रषीकेषा।।
उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज
उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं कुरु।।
    
भूपाळी गणपतीची
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी ॥ धृ ॥
अंगी शेंदुराची उटी । माथां शोभतसे किरीटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी शोभा। स्मरतां उभा जवळी तो ॥२॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकाची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी ॥ धृ ॥

भूपाळी रामाची
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णियली। गणिका केली ते मुक्त॥२॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिलें भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैल्यबाळीसमवेत ॥ धृ ॥

भूपाळ्या भाग १


उत्थापन
प्रभात काळी उठुनी सकाळी वनमाळी गावा
सद्भावे पदकमली सतत आश्रय मागावा ।।धृ।।
रामकृष्ण हरि विठ्ठल केशव घेऊनिया नामा
ब्रह्मानंदी मग्न होऊनी प्रत्यय जाणावा ।।१।।
नश्वर हा संसार असा निज आत्मा बोधावा
परमार्थी मन वळवुनी शाश्वत मोक्षचि साधावा।।२।।
सगुणी निर्गुण जाणुनी आत्मा स्वरुपी मिळवावा
प्रेमळ छंदे गाऊनिया प्रभु हळु हळु आळवावा।।३।।

*******
गरुडाचे पायी ठेवीन वेळोवेळी डोई
वेगे आणावा तो हरी मग दिनाते उध्दरी।।
पाय लक्ष्मीचे हाती तिचे आम्ही काकुळती
तुका म्हणे शेषा  जागे करा ह्रषीकेषा।।
उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज
उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं कुरु।।
    
भूपाळी गणपतीची
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी ॥ धृ ॥
अंगी शेंदुराची उटी । माथां शोभतसे किरीटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी शोभा। स्मरतां उभा जवळी तो ॥२॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकाची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी ॥ धृ ॥

भूपाळी रामाची
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णियली। गणिका केली ते मुक्त॥२॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिलें भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैल्यबाळीसमवेत ॥ धृ ॥

भूपाळ्या

भूपाळ्या

उत्थापन
प्रभात काळी उठुनी सकाळी वनमाळी गावा
सद्भावे पदकमली सतत आश्रय मागावा ।।धृ।।
रामकृष्ण हरि विठ्ठल केशव घेऊनिया नामा
ब्रह्मानंदी मग्न होऊनी प्रत्यय जाणावा ।।१।।
नश्वर हा संसार असा निज आत्मा बोधावा
परमार्थी मन वळवुनी शाश्वत मोक्षचि साधावा।।२।।
सगुणी निर्गुण जाणुनी आत्मा स्वरुपी मिळवावा
प्रेमळ छंदे गाऊनिया प्रभु हळु हळु आळवावा।।३।।

*******
गरुडाचे पायी ठेवीन वेळोवेळी डोई
वेगे आणावा तो हरी मग दिनाते उध्दरी।।
पाय लक्ष्मीचे हाती तिचे आम्ही काकुळती
तुका म्हणे शेषा  जागे करा ह्रषीकेषा।।
उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज
उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं कुरु।।
    
भूपाळी गणपतीची
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी ॥ धृ ॥
अंगी शेंदुराची उटी । माथां शोभतसे किरीटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी शोभा। स्मरतां उभा जवळी तो ॥२॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकाची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
रिध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासासी ॥ धृ ॥

भूपाळी रामाची
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णियली। गणिका केली ते मुक्त॥२॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिलें भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैल्यबाळीसमवेत ॥ धृ ॥
भूपाळी आत्मारामाची
उठा प्रातःकाळ झाला। आत्माराम पाहूं चला ।
हा समयो जरी टळला। तरी अंतरला श्रीराम ॥धृ०॥
जीव-शिव दोघेजण।  भरत आणि शत्रुघ्न ।
आला बंधु लक्ष्मण।  मन उन्मन होऊनी ॥१॥
विवेक वसिष्ठ सदगुरु।  संत सज्जन मुनीश्वरु ।
करिती नामाचा गजरु।  हर्षनिर्भर होउनिंया ॥२॥
सात्त्विक सुमंत प्रधान।  नगरवासी अवघे जन ।
आला वायूचा नंदन।  श्रीचरण पहावया ॥३॥
माता जानकी बिघडली।  होती प्रारब्धे लिहिली ।
तिची देहबुद्धी जाळिली।  आलिंगिली श्रीरामे ॥४॥
आजची दिवाळी दसरा।  पर्वकाळ आला घरा ।
रामानंदाच्या दातारा। भेटी माहेरा मज द्यावी ॥५॥
उठा प्रातःकाळ झाला। आत्माराम पाहूं चला ।
हा समयो जरी टळला। तरी अंतरला श्रीराम ॥धृ०॥
       
भूपाळी पंढरीरायाची
(१)
उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊ पंढरीसी ।
भेटो विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविधताप हरतील॥धृ॥
चंद्रभागे करु स्नान । घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन । तेणे मन निवेल ॥ १ ॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्णा भागिरथी ।
तुंगभद्रा भोगावती । येती श्रीपती दर्शना ॥ २ ॥
तापी नर्मदा कावेरी । पंचगंगा गोदावरी ।
स्नाने केलिया बोहरी । महादोष हरतील ॥ ३ ॥
रामानंदाचे माहेर । क्षेत्र नाम पंढरपूर ।
माता पिता विश्वंभर । पैलपार तरतील ॥ ४ ॥
उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊ पंढरीसी ।
भेटो विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविधताप हरतील॥धृ॥
                 (२)
उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळां ||
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा || धृ ||
संत साधु मुनी अवघे झालेती गोळा |
सोडा शेज सुख आता पाहू द्या मुख कमळा ||||
रंग मंडपी महाद्वारी झाली असे दाटी |
मन उतावीळ रूप पहावया दृष्टी  ||||
राई रुखमाबाई तुम्हा येऊ दया |
शेजे हालवुनी जागे करा देवराया ||||
गरुड  हनुमंत उभे पाहती वाट|
स्वर्गीचे सुरवर घेऊनी आलें बोभाट ||||
झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा |
विष्णुदास नामा उभा घेउनी काकडा ||||
उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळां ||
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा || धृ||

भूपाळी गोपाळाची
उठी रे गोपाळा उघडी स्वरुप लोचना ।
सरली अविद्या राती उदयो झाला रविकिरणा ।।
इंद्रिये गोधने नेई निर्गुण कानना ।
सुटली मानस वत्से तुजविण नाकळती कोणा ।।धृ।।
प्रबोध पहाट झाली सरले तिमिर तम-रज ।
गुरुकृपेचा अरुण दावी सुरंगम तेज ।।
आत्मा-दिनकर पाठी प्रकटे तात्काळिक सहज।
जिवचंद्राचे मंडळ तेणे झाले निस्तेज ।।१।।
दृष्यभास चांदणिया असते ठायिच लोपलिया ।
लिंगदेह कमळीणीचे मधुकर सुटले आपसया ।।
बुध्दीबोध चक्रवाके मिनली आपणिया ।
देहबुध्दि कुमुदिनी सुकोनी गेलीसे विलया ।।२।।
योग विद्येच्या पंथे साधक वृंदे चालियली ।
उपनिषद् भावार्थ शब्द केला कोकिळी ।।
वाग्वादाचे उलूक रिघती मौनाचे ढोली ।
विकल्प अटवी साही चारी चारी सांडियली ।।३।।
विराग रश्मी जवळी धरिता चित्त रविकांत ।
आत्मवन्हि प्रगटे विषय वन हे जाळीत ।।
तृष्णेच्या श्वापदांवरी प्रळय अद्भूत ।
विश्व हे लटिके मूढा मृगजळवत ।।४।।
जारव्यसनी जीव हा झाला उदमी सुविचार ।
वासना कुंटिणिचा सहजे खुंटला व्यापार ।।
लीला-विश्वंभर स्वामी उठिला सत्वर ।
चाले मुक्तेश्वर संगे धरुनिया कर ।।५।।
उठी रे गोपाळा उघडी स्वरुप लोचना ।
सरली अविद्या राती उदयो झाला रविकिरणा ।।
इंद्रिये गोधने नेई निर्गुण कानना ।
सुटली मानस वत्से तुजविण नाकळती कोणा ।।धृ।।


भूपाळी संतांची

उठि उठिबा पुरुषोत्तमा । भक्तकाम कल्पद्रुमा ।।
आत्मारामा निजसुखधामा।
              मेघ:श्यामा श्रीकृष्णा ।।धृ।।
संत मंडळी महाद्वारी । उभी तिष्टत श्रीहरी ।।
जोडोनिया दोन्ही करी । तुज मुरारी पाहावया ।।१।।
संत सनकादिक नारद ।
              व्यास वाल्मीकी ध्रुव प्रल्हाद ।।
पार्थ पराशर रुक्मांगद ।
              हनुमान अंगद बळिराजा ।।२।।
झाला प्रात:काळ पूर्ण । करी पंचांग श्रवण ।।
आला मुद्गल भट ब्राह्मण ।
               आशिर्वचन घे त्यांचे ।।३।।
तुझा नामदेव शिंपी । घेऊनी आला आंगी टोपी ।
आता जाऊ नको बां झोपी ।
              दर्शन देई निज भक्ता ।।४।।
नाना परिचे अलंकार ।
              घेऊनी आला नरहरि सोनार ।।
आला रोहिदास चांभार ।
              जोडा घेऊनी तुजलांगी ।।५।।
सुगंध सुमने पुष्पांजुळी ।
              घेऊनी आला सावतामाळी ।।
म्हणे श्रीहरि पदकमळी । अनन्यभावे समर्पू ।।६।।
कान्होपात्रा नृत्य करी । टाळछंदे साक्षात्कारी ।।
सेना न्हावी दर्पण करी । घेऊनी उभा राहिला ।।७।।
लिंबुर हुरडा घेऊनी आला ।
              तो हा माणकोजी बोधला ।।
दर्शन द्यावे बा! त्याजला ।
              भक्त भोळा म्हणऊनी ।।८।।
मिराबाई तुझेसाठी । दूध-तुपे भरुनी वाटी ।।
तुज लावावया ओठी । लक्ष लावुनी बैसली ।।९।।
नामदेवाची जनी दासी ।
              घेऊन आली तेल-दीपासी ।।
तुज न्हाऊ घालावयासी ।
              उभी ठेली महाद्वारी ।।१०।।
गूळ-खोबरे भरुनी गोणी ।
              घेऊनी आला तुकया वाणी ।।
वह्या राखिल्या कोरड्या पाणी ।
              भिजो दिल्या नाही त्वां ।।११।।
आला चोखामेळा महार । स्वामी करीतसे जोहार ।
त्याचा करोनिया उध्दार ।
                 संतमेळी स्थापिला ।।१२।।
हरिभजनाविण वाया गेले ।
                   ते नरदेही बैल झाले ।।
गोऱ्याकुंभारे आणिले । खेळावया तुजलागी ।।१३।।
गरुडपारी हरिरंगणी ।  टाळ-मृदंगाची ध्वनी ।।
महाद्वारी हरिकिर्तनी ।
              तल्लिन कान्हा हरिदास ।।१४।।
निजानंदे रंगे पूर्ण ।  सर्वही कर्मे कृष्णार्पण ।।
श्रीरंगानुज तनुज शरण ।
              चरणसेवा करितसे ।।१५।।
*******