।।सप्तमं कालरात्री।।
मूलमंत्र
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी।।
वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।।
ध्यान
करालदनां घोरांमुक्तकेशींचतुर्भुजाम्।
कालरात्रिंकरालिंकादिव्यांविद्दुत्मालाविभूषिताम्।।
दिव्यलोहखङ्ग वामाघोर्ध्वकराम्बुजाम्।
अभयंवरदांचैव दक्षिणोद्व्राघ:पाणिकाम्।।
महामेघप्रभांश्यामांतथा चैपगर्दभारुढाम्।
घोरदंष्टाकारालास्यांपीनोन्नतपयोधराम्।।
सुखप्रसन्न वदनास्मेरानसरोरुहाम्।
एवंसंचियन्तयेत्कालरात्रिंसर्वकामसमृद्धिधदाम्।।
स्तोत्र
ह्रीं कालरात्रि श्रींकराली चक्लींकल्याणी कलावती।
कालमाताकलिदर्पध्नीकमदींशकृपन्विता।।
कामबीजजपान्दाकमबीजस्वरुपिणी।
कुमतिघनीकुलीनार्तिनशिनीकुल कामिनी।।
क्लीं ह्रीं श्रीं मंत्रवर्णेनकालकण्टकघातिनी।
कृपामयी कृपाधारा कृपापारा कृपागमा।।
कवच
ॐ क्लींमेंह्रदयंपातु पादौश्रींकालरात्रि।
ललाटेसततंपातुदुष्टग्रहनिवारिणी।।
रसनांपातुकौमारी भैरवी चक्षुणोर्मम।
हौपुष्ठेमहेशानीकर्णोशंकरभामिनी।।
वर्जितानितुस्थानाभीयानिचकवचेनहि।
तानिसर्वाणिमें देवीं सततंपातुस्तभ्भिनी।।
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी।।
वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।।
ध्यान
करालदनां घोरांमुक्तकेशींचतुर्भुजाम्।
कालरात्रिंकरालिंकादिव्यांविद्दुत्मालाविभूषिताम्।।
दिव्यलोहखङ्ग वामाघोर्ध्वकराम्बुजाम्।
अभयंवरदांचैव दक्षिणोद्व्राघ:पाणिकाम्।।
महामेघप्रभांश्यामांतथा चैपगर्दभारुढाम्।
घोरदंष्टाकारालास्यांपीनोन्नतपयोधराम्।।
सुखप्रसन्न वदनास्मेरानसरोरुहाम्।
एवंसंचियन्तयेत्कालरात्रिंसर्वकामसमृद्धिधदाम्।।
स्तोत्र
ह्रीं कालरात्रि श्रींकराली चक्लींकल्याणी कलावती।
कालमाताकलिदर्पध्नीकमदींशकृपन्विता।।
कामबीजजपान्दाकमबीजस्वरुपिणी।
कुमतिघनीकुलीनार्तिनशिनीकुल कामिनी।।
क्लीं ह्रीं श्रीं मंत्रवर्णेनकालकण्टकघातिनी।
कृपामयी कृपाधारा कृपापारा कृपागमा।।
कवच
ॐ क्लींमेंह्रदयंपातु पादौश्रींकालरात्रि।
ललाटेसततंपातुदुष्टग्रहनिवारिणी।।
रसनांपातुकौमारी भैरवी चक्षुणोर्मम।
हौपुष्ठेमहेशानीकर्णोशंकरभामिनी।।
वर्जितानितुस्थानाभीयानिचकवचेनहि।
तानिसर्वाणिमें देवीं सततंपातुस्तभ्भिनी।।
दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध
आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन
'सहार' चक्रात स्थिर झालेले
असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर
झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या
साक्षात्कारापासून मिळणार्या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा
नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.
या देवीचा रंग काळा
आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला
तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत आणि त्यांतुन अग्नीचा
वर्षाव होत असतो. ते अतिशय चमकदार आहेत. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून
अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात.
गाढव हे कालरात्री
देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते.
उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा
आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे. काही ठिकाणी तिचे वर्णन असे आहे. माता
कालरात्री सर्व वाईट शक्तींचा बिमोड करते. तिला चार हात असून उजवे हात अभय व वरद
मुद्रेत आहेत तर डाव्या हातांमध्ये दिवा आणि कोयता आहे.
रक्तबीज नावाच्या
राक्षसाचा वध करण्यासाठी देवी पार्वती ने आपल्या सुंदर त्वचेचा त्याग करून
अतिभयंकर व हिंस्त्र अश्या कालरात्रीचे स्वरूप परिधान केले. रक्तबीजाच्या रक्ताचा
थेंब जमिनीवर पडताक्षणी त्या थेंबातून अजून एक रक्तबीज निर्माण होत असे. त्यामुळे
त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाला जमिनीवर पडायच्या आधीच पिऊन माता कालरात्रीने
त्याचा वध केला.
कालरात्रीचे रूप
दिसायला अत्यंत भयाकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे
भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी
आहे. राक्षस, भूतप्रेत
तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या
देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन
केले पाहिजे.
मन, वचन आणि देह पवित्र
ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्या शुभ कामांची गणना
केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.
मंत्र, ध्यान, कवचासहित विधीपूर्वक उपासना करणा-या भक्ताचे भानु चक्र जागृत होते. माता कालरात्रिच्या उपासनेने अग्निभय, आकाशभय दूर होते. भूत पिशाच्च इत्यादि शक्ति तिच्या नुसत्या स्मरणाने दूर पळुन जातात. माता कालरात्रिचे स्मरण पुढील मंत्राने करतात.
मंत्र, ध्यान, कवचासहित विधीपूर्वक उपासना करणा-या भक्ताचे भानु चक्र जागृत होते. माता कालरात्रिच्या उपासनेने अग्निभय, आकाशभय दूर होते. भूत पिशाच्च इत्यादि शक्ति तिच्या नुसत्या स्मरणाने दूर पळुन जातात. माता कालरात्रिचे स्मरण पुढील मंत्राने करतात.
या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै
नमो नम: ।।