राम-कृष्ण
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. त्यानिमित्ताने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे वर्णन असलेले राम-कृष्ण एकरूप हे समर्थ रामदासस्वामी यांचे काव्य आपल्यापुढे सादर करीत आहे.
करा रे जनीं भक्ति या राघवाची । करीता मनीं वेर्थ चिंता
भवाची ।
करी बाण कोदंड हे ठाण देखा । मनीं चिंतितां दुर्जना कोण
लेखा ।।१।।
खरा कृष्ण हा विष्णु
पूर्णावतारी । चतुर्भुज पीतांबरु चक्रधारी ।
गरुडध्वज पावतो लागवेगें
। दिनाकारणे सर्व सांडूनि मागें ।।२।।
गळा वैजयंती रूळे कंठमाळा । कटीं किंकिणी मेखळा ज्वाळमाळा ।
गुणी राम हा गुणरत्ने अमोघें । प्रभा फाकलीं दुथडी
कीर्तिबोधें ।।३।।
घरे सुंदरे व्दारका
पुण्यभूमी । तयेमाजि हा कृष्णजी निजधामीं ।
गुणे आगळा वर्णितां
वर्णवेना। लिळावेश ब्रह्मांदिकां ही कळेना ।।४।।
नसे युध्य तेणें चि नामें अयोध्या। प्रतापें बळे आगळा राम योध्या
।
रणी प्राणहर्ता बळाढ्या विरांचा। माहां संकटी कार्यकर्ता
सुरांचा ।।५।।
चरित्रें विचित्रें करी
गोपिनाथु । क्रिडाकौतुकें नाटकी तो समर्थु ।
यमुने तिरीं गोपि गोपाळ
बछे । ध्वनी लोधलीं ऊर्ध वाहूनि पुछें ।।६।।
छबीने बहू क्षेत्र माही निशाणें । माहाराज हा वर्णिजे यासि
कोणे।
दुजी ऊपमा रामचंद्रा न साजे । सुरारीवरी तोडरीं ब्रीद गाजे ||७||
जेणे पर्वताचे तळीं
गोकुळासीं । बळें राखिले नाथिले काळयासी ।
जेणे घेतले सर्व ही
भक्तवोझें। रणी घेतली पांडवालागि जूझे ।।८।।
झळाळीत गंडस्थळें कुंडलें तें । उणें बोलिजे सर्व ही
उपमेतें ।
जेणे घेतले सर्व लावण्य जाया । नमस्कार माझा तथा रामपायां
।।९।।
येमाया यमातें भजा
उत्तमातें । तजा आणिकें दैवतें सर्वमत्तें ।
धरा मानसी कृष्ण हा प्रेम
सांटी। त्रिभंगी उभा रुपलावण्यपेटी ।।१०।।
टिळा रेखिला कस्तुरीकेशराचा । लपेटा सिरी रम्य
दिव्यांबरांचा ।
तुळेना समरंगणी शक्ति लाटी । उभा राम तूणीर बांधोनि पाठी
।।११।।
ठकारें उभा देहुडां
पाउलीं हा । बळें नेतसे चित्त चोरूनि पाहा ।
मनीं लागली सर्व ही
कृष्णगोडी । जनीं सोडितां सर्वथा ही न सोडी ।।१२।।
डगा टाकितां दैत्य बाहेर दीसे । तयालागि बिभीषणा राग पूसे ।
पुढे राघवें वाईला चंडमेढा । रणी झोडिला पाडिला दैत्य गाढा ।।१३।।
ढळेना प्रिती लागली
माधवाची। उभी साजिरी मूर्ति दे चित्सुखाची ।
कृपाळु हरी अंतरीं सर्व
जाणे । तया देखतां सर्व हि सूख बाणे ।।१४।।
नसे दुख ना दंड ना मृत्यमारु । नसे शोक ना लोकनिंदाधिकारु ।
नसे काळ दुकाळ उदेग चिंता । नसे शब्दकापट्य हे रामसत्ता ।।१५।।
तनु सांवळी वेणु वाहे
त्रिभंगी। किडाकौतुकी गोपि गोपाळ संगी।
स्वयें जाहला कृष्ण हा
विश्वसत्ता। धरी रे मना गोपिनाथा समर्था ।।१६।।
थरारी धरा सप्त पाताळ जेव्हां । करारी बळें चंड कोदंड
तेव्हां ।
सुरांकारणे पेटला राम व्दंव्दा । चपेटातळीं मस्तकें होति
चेंदा ।।१७।।
दयासागरें नागरें
गोपिवेशें । बहू दैत्य संव्हारिले बाळतोषें ।
जयाची अती खोल कौसाल्य
बुधी । विचारें माहां मत्त तो दैत्य साधी ।।१८।।
धिटा वाजटा किंकिणी च्यापबंदी । झणत्कारती डोलती रामछेंदी।
अती धीर गंभीर तो राम नेणा । बळें सोडिले देव तो देवराणा ।।१९।।
नसे तूळणा तूळितां
यादवासी । महावीर ने धीर हे सोमवौंसी ।
जयांच्या प्रतापें सदा
काळ कांपे । धरा घालिती पालथी सर्व कोपें ।।२०।।
पळाले बळें पीटिले मारूतानें । दडाले पुरीमाजि हे थोर मानें
।
भयें कांपिती लोपती देति थापा । वृथा बोलती कापिती वेर्थ
लाफा ।।२१।।
फटी फावळी वानरां येक
वेळां । चळी कांपती वेर्थ राजे चळाळां ।
बळें नाथिला काळ लंबी
बिलंबी । लिळा खेळतां दृमस्तंबीं कदंबीं ।।२२।।
बळे आगळा मारुती
कोटिगूणें । जया रोमरंध्री निघे सैन्य दुणे ।
दडे मछमूखीं पडे कृष्ण
लोभा । चढे विक्रमू आगळी दिव्य शोभा ।।२३।।
भला मारुती जिंकिला
कृष्णनाथें । रणी रक्षिली पांडवे ती आनाथें।
ध्वजीं लाविला विक्रमें
पूर्णकामे । यदुनायकें सत्य नेमें विराम ।।२४।।
मनी सर्वदा सर्व कापट्य
जागे। दिनाचे परी याचकु भीक मागे ।
नटाचे परी पालटी कृष्ण
काया। करी संकटी थोर शत्रु जिणाया ।।२५।।
येणें राघवें मारिला वेर्थ वाळी । नव्हे नीति हे सर्व केली
धुमाळी ।
विरोधेविणे सर्व ही राज्य द्वारी । नव्हे निर्मळु राम
कापट्यधारी ।।२६।।
रघुनंदनें दुष्टसंव्हार केला । अती आदरें धर्म तो रक्षियेला
।
तया वाळिचें ही बरें हीत केलें । कृपाळुपणें मोक्षपंथास
नेले ।।२७।।
लघुचे परी वेर्य आरण्यपंथे । करुणास्वरें आळवी जानकीतें ।
तया राघवा धीर कैसें म्हणावें । जयां अस्त्रियांचेनि कामें
जिणावें ।।२८।।
वनीं लाघवी शैल्येजा वेशधारी । सितेसारिखी येकली दिव्य नारी
।
परी अंतरीं नूठिजे काम लेशें । सितेवीण ही राज्य केलें
सुरेशें ।।२९।।
सवे लागली देवकीनंदनाची ।
माहां मल्ल चाणूर हो कंदनाची ।
तयावीण आणीक कांहीं
दुराशा। तयाचे कृपेची बहूसी मिपाशा ।।३०।।
शवा ऊठवीलें रघुनायकानें । कृपासागरें सूमतीदायकानें ।
कपी सर्व ही सेवीं तो सुवासी। बळे आणिलें त्या लघु
ब्राह्मणासी ।।३१।।
समस्तामधें सार गोपाळकाला
। तया देखतां चाखतां जीव घाला।
स्वयें स्वंगड्या वांटितो
कृष्ण पाहा। गडी खेळती तो चि आनंद माहां ।।३२।।
हरें जाणिजे राम कोदंडपाणी । अहिल्या सिळारूप लावण्यखाणी ।
जन सर्व आनंदले राज्य केलें । पुढें ग्राम ही मोक्षपंथासि
नेलें ।।३३।।
क्षमा सर्वदा ऐक्यरूपें
करावी। पथी आदरें सार्थकाची धरावी ।
म्हणे दास द्वैतास हो
नातळावें । जळाचे परी सर्व भूतीं मिळावे ।।३४।।
।। जय जय
रघुवीर/यदुवीर समर्थ ।।