आजी आजोबा दिवस
लेखक- अनिल अनंत वाकणकर,
रिलायन्स ग्रीन्स, मोटी खावडी,
जामनगर(गुजरात)
आज आर्याच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होते म्हणून गेलो होतो. शाळेचे नांव आहे, कोकीळाबेन धिरुभाई अंबानी विद्यामंदिर. रिलायन्स ग्रीन्स टाऊनशीप मध्ये असणाऱ्या या शाळेतील वेगळेपण आज जाणवले. आजचा दिवस येथे आजी आजोबा दिवस म्हणून साजरा केला जात होता. मुळात ही कल्पनाच खूप आकर्षक आहे. हम दो हमारे दोच्या जमान्यात मुलांना आजी आजोबांचे दर्शन मिळणे देखिल मुश्किल झाले आहे. याला कारण आम्हीच आहोत. पूर्वीसारखी एकत्र कुटूंब पध्दती जरी अस्तित्वात नसली तरी हल्ली मुले उच्चशिक्षित असतात. आरक्षणाच्या जमान्यात आपल्यातिल गुणांना वाव मिळावा म्हणून ती जिथे मिळेल तिथे नोकरी करायच्या मनस्थितीत असतात. त्यामुळे आजी आजोबा गावाकडे रहातात आणि मुले दूर कुठेतरी आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या मुलांसह रहातात. त्या ठिकाणी आजी आजोबांना जाता येतेच असे नाही. त्यामुळे नातवंडांना रोजच्या रोज आजी आजोबांना भेटता येत नाही, त्यांच्याशी खेळता येत नाही. त्यांच्याकडून गोष्टी ऐकता येत नाहीत.
या पार्श्वभूमिवर आजचा दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करणे खूपच भावले. आजी आजोबा आणि नातवंडांचे नाते काही वेगळेच असते. आपल्याकडे पूर्वापार असे म्हटले जाते की, दूध ऊतू गेले तरी चालेल परंतु त्यावरची साय जाता कामा नये. साय गेली तर जास्त हळहळ लागते. नातवंडांचे नेहमीच हट्ट पुरवीले जातात. जे मुलांना देणे कटाक्षाने टाळले, ते नातवंडांच्या बाबतित होतेच असे नाही. मुलांच्या बाबतितला कठोरपणा नातवंडांच्या बाबतित औषधालाही शिल्लक रहात नाही. मागे एकदा मी पांडुरंगशास्त्री आठवले यांचे प्रवचन ऐकले होते. त्यात त्यांनी असे सांगितले होते की, आई वडिलांचे गुण त्यांच्या मुलांच्या ऐवजी त्यांच्या नातवंडांमध्ये उतरतात. त्यामुळे कदाचित असे होत असावे.
रिलायन्स ग्रीन्स येथे नेहमीच जेष्ट नागरीकांना मान दिला जातो. आपल्या कर्मचाऱ्यांच्या वृध्द मातापित्यांकरीता येथे काही विशेष कार्यक्रमांचे देखिल आयोजन केले जाते. मागे अधिक महिन्यांत जेष्ट नागरीकांची खास सहल येथे आयोजित केली गेली होती. मातृ देवो भव! पितृ देवो भव! या वचनांची येथे आठवण ठेवली जाते. नवीन पिढीवर चांगले संस्कार व्हावेत, आपल्या आजी आजोबांच्या त्यागाची, त्यांच्या नातवंडांवरील प्रेमाची, ते करीत असलेल्या संस्कारांची ओळख व्हावी म्हणून आजचा दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करीत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी आवर्जुन सांगितले.
आज साजरा केलेला कार्यक्रम अतिशय आखिव रेखीव होता. कार्यक्रमाचे संचालन देखिल पहिलीतल्या छोट्या मुलांनी केले होते. हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य. कार्यक्रमाची सुरुवात वक्रतुंड महाकाय..... या गणेश वंदनेने केली गेली, त्यानंतर याकुंदेन्दु तुषार हार धवला...... हा सरस्वतीचा ध्यान मंत्र सादर केला गेला. हे दोन्ही संस्कृत श्लोक देखिल पहिलीतल्या छोट्या मुलांनी अगदी स्वच्छ उच्चार करुन सादर केले. आपल्या आजी आजोबांकरीता सादर केलेले सर्वच कार्यक्रम खूप छान झाले. ते सादर करण्याकरीता मुलांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी देखिल खूपच मेहनत घेतलेली दिसत होती. या पार्श्वभूमिवर आमचे पहिलीतले दिवस आठवले तर असे लक्षांत येते की, आम्ही साधे परक्या माणसांशी सुध्दा बोलायला घाबरायचो परंतु आज ही सर्व मुले हजारभर प्रेक्षकांच्या समोर न घाबरता, न लाजता बिनधास्तपणाने कार्यक्रम सादर करीत होती.
अशाप्रकारे या शाळेने केलेला सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे, अभिनंदनिय आहे. सर्वच शाळांनी आपल्याकडे सुरु करावा असा आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून येथे जवळच असणाऱ्या वृध्दाश्रमातिल मंडळींना बोलावले होते.
लेखक- अनिल अनंत वाकणकर,
रिलायन्स ग्रीन्स, मोटी खावडी,
जामनगर(गुजरात)
आज आर्याच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होते म्हणून गेलो होतो. शाळेचे नांव आहे, कोकीळाबेन धिरुभाई अंबानी विद्यामंदिर. रिलायन्स ग्रीन्स टाऊनशीप मध्ये असणाऱ्या या शाळेतील वेगळेपण आज जाणवले. आजचा दिवस येथे आजी आजोबा दिवस म्हणून साजरा केला जात होता. मुळात ही कल्पनाच खूप आकर्षक आहे. हम दो हमारे दोच्या जमान्यात मुलांना आजी आजोबांचे दर्शन मिळणे देखिल मुश्किल झाले आहे. याला कारण आम्हीच आहोत. पूर्वीसारखी एकत्र कुटूंब पध्दती जरी अस्तित्वात नसली तरी हल्ली मुले उच्चशिक्षित असतात. आरक्षणाच्या जमान्यात आपल्यातिल गुणांना वाव मिळावा म्हणून ती जिथे मिळेल तिथे नोकरी करायच्या मनस्थितीत असतात. त्यामुळे आजी आजोबा गावाकडे रहातात आणि मुले दूर कुठेतरी आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या मुलांसह रहातात. त्या ठिकाणी आजी आजोबांना जाता येतेच असे नाही. त्यामुळे नातवंडांना रोजच्या रोज आजी आजोबांना भेटता येत नाही, त्यांच्याशी खेळता येत नाही. त्यांच्याकडून गोष्टी ऐकता येत नाहीत.
या पार्श्वभूमिवर आजचा दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करणे खूपच भावले. आजी आजोबा आणि नातवंडांचे नाते काही वेगळेच असते. आपल्याकडे पूर्वापार असे म्हटले जाते की, दूध ऊतू गेले तरी चालेल परंतु त्यावरची साय जाता कामा नये. साय गेली तर जास्त हळहळ लागते. नातवंडांचे नेहमीच हट्ट पुरवीले जातात. जे मुलांना देणे कटाक्षाने टाळले, ते नातवंडांच्या बाबतित होतेच असे नाही. मुलांच्या बाबतितला कठोरपणा नातवंडांच्या बाबतित औषधालाही शिल्लक रहात नाही. मागे एकदा मी पांडुरंगशास्त्री आठवले यांचे प्रवचन ऐकले होते. त्यात त्यांनी असे सांगितले होते की, आई वडिलांचे गुण त्यांच्या मुलांच्या ऐवजी त्यांच्या नातवंडांमध्ये उतरतात. त्यामुळे कदाचित असे होत असावे.
रिलायन्स ग्रीन्स येथे नेहमीच जेष्ट नागरीकांना मान दिला जातो. आपल्या कर्मचाऱ्यांच्या वृध्द मातापित्यांकरीता येथे काही विशेष कार्यक्रमांचे देखिल आयोजन केले जाते. मागे अधिक महिन्यांत जेष्ट नागरीकांची खास सहल येथे आयोजित केली गेली होती. मातृ देवो भव! पितृ देवो भव! या वचनांची येथे आठवण ठेवली जाते. नवीन पिढीवर चांगले संस्कार व्हावेत, आपल्या आजी आजोबांच्या त्यागाची, त्यांच्या नातवंडांवरील प्रेमाची, ते करीत असलेल्या संस्कारांची ओळख व्हावी म्हणून आजचा दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करीत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी आवर्जुन सांगितले.
आज साजरा केलेला कार्यक्रम अतिशय आखिव रेखीव होता. कार्यक्रमाचे संचालन देखिल पहिलीतल्या छोट्या मुलांनी केले होते. हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य. कार्यक्रमाची सुरुवात वक्रतुंड महाकाय..... या गणेश वंदनेने केली गेली, त्यानंतर याकुंदेन्दु तुषार हार धवला...... हा सरस्वतीचा ध्यान मंत्र सादर केला गेला. हे दोन्ही संस्कृत श्लोक देखिल पहिलीतल्या छोट्या मुलांनी अगदी स्वच्छ उच्चार करुन सादर केले. आपल्या आजी आजोबांकरीता सादर केलेले सर्वच कार्यक्रम खूप छान झाले. ते सादर करण्याकरीता मुलांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी देखिल खूपच मेहनत घेतलेली दिसत होती. या पार्श्वभूमिवर आमचे पहिलीतले दिवस आठवले तर असे लक्षांत येते की, आम्ही साधे परक्या माणसांशी सुध्दा बोलायला घाबरायचो परंतु आज ही सर्व मुले हजारभर प्रेक्षकांच्या समोर न घाबरता, न लाजता बिनधास्तपणाने कार्यक्रम सादर करीत होती.
अशाप्रकारे या शाळेने केलेला सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे, अभिनंदनिय आहे. सर्वच शाळांनी आपल्याकडे सुरु करावा असा आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून येथे जवळच असणाऱ्या वृध्दाश्रमातिल मंडळींना बोलावले होते.